22 August 2014

कबड्डी कबड्डी


मला स्पोर्ट्स पाहण्याची फारशी आवड नाही. आणि तसंही भारतात क्रिकेट शिवाय इतर खेळ फारसे पहिलेही जात नाहीत. क्रिकेट वर माझे फार प्रेम नाही (तसा फार रागही नाही).. कधीतरी वर्ल्ड कप वगैरे सुरु असेल तर एखादी मैच पाहते.. पण एरवी मी काही भारतीय 'क्रिकेट' धर्माची उपासक नाही.. लहानपणी टेनिसच्या मैच पहिल्या होत्या.. पण त्याही कधीतरीच.. थोडक्यात काय तर TVवर स्पोर्ट्स पाहण्याची वेळ विरळाच..

पण असं असतानाही मला सध्या एक नवीन छंद जडला आहे.. तो म्हणजे कबड्डीच्या मैच बघण्याचा.. त्याचं काय झालं.. गेल्या महिन्यात माझ्या एका भावाला घरी जेवायला बोलावलं होतं.. त्याने घरी आल्या आल्या स्टार गोल्ड लावायला सांगितलं.. पाहिलं तर 'प्रो-कबड्डी' नावाने कबड्डीचा खेळ मांडला होता (अगदी क्रिकेटच्या IPL सारखाच).. त्यादिवशी जयपूर आणि मुंबई या टीम्सची मैच होती.. आम्ही भावाबरोबर ती मैच एन्जॉय केली.. आणि त्या दिवसापासून तो रोज संध्याकाळचा कार्यक्रम झाला..

मी लहानपणी जे खेळ खूप आवडीने खेळले आहेत, त्यापैकी कबड्डी हा एक खेळ आहे (दुसरे म्हणजे लगोरी आणि खोखो).. या रोमांचक खेळाची आठवण आली तरी अंगावर काटा येतो.. दुसऱ्यावर आक्रमण केल्यावर जास्तीत जास्त जणांना बाद करून शिताफीनं परतायचं आणि दुसऱ्याने आपल्यावर आक्रमण केलं की काही करून त्याला पकडायचं.. यात वेगळीच मजा असते.. आपल्यापैकी जवळजवळ सगळ्यांनीच हा खेळ लहानपणी खेळलेला असतो.. मात्र काळाच्या ओघात त्याचा विसर पडत जातो..

मागे माझ्या पोलिटिक्स च्या सरांशी चर्चा करत होते.. की क्रिकेट आणि पारंपारिक भारतीय खेळ ह्यात काय फरक आहे.. ते म्हणाले, खोखो, कबड्डी, लगोरी ह्या भारतीय खेळांत सहखेळाडूंना स्पर्श करावा लागतो.. आणि त्यातून एकमेकांबद्दल आपुलकी वाढते.. भारतीय माणूस हा मुळातच समाजशील आहे.. ह्याउलट ब्रिटीश लोक व्यक्तीस्वातंत्रवादी आहेत.. त्यामुळे त्यांचा खेळ म्हणजेच क्रिकेट सगळे एकमेकांपासून लांब उभे राहून खेळतात.. मजेशीर मुद्दा आहे.. पण पटण्यासारखा आहे.. ज्यांच्या खांद्याला खांदा लावून आपण हे खेळ खेळलो आहोत, त्या बालसवंगड्याबद्दल एक वेगळाच जिव्हाळा आपल्या मनात असतो.. असो.. 'प्रो-कबड्डी'च्या निमित्ताने ह्या सगळ्या गतकाळातील आठवणींना उजाळा मिळाला..

भारतात विविध खेळांत प्राविण्य मिळवलेले अनेक खेळाडू आहेत.. ज्यांची आपल्याला साधी नावंही माहित नसतात.. क्रिकेट खेळणाऱ्यांची मात्र गरजेपेक्षा जास्त माहिती आपल्याकडे असते (काही स्पोर्ट्स पेज आणि काही पेज ३ च्या माध्यमातून मिळालेली.. असो..).. 'प्रो-कबड्डी'च्या निमित्ताने अनेक कबड्डीपटूंशी ओळख झाली.. प्रत्येकाचे मूळ गाव कुठले येथपासून त्यांना कुठले पुरस्कार मिळाले आहेत, ह्याचीही माहिती झाली.. प्रत्येकाच्या विशेष खुबी कळल्या.. भारतीय कबड्डी संघाचा कर्णधार राकेश कुमार कितीही जणांनी धरलं तरी जमिनीच्या आधाराने कसा निसटतो ते पाहिलं.. तसंच कितीही कठीण परिस्थिती असेल तरी संयमाने आणि शांतपणे गुण कमावणारा उप-कर्णधार अनुप कुमार पाहिला.. तसंच हिमाचलच्या अजय ठाकूरची वेगळीच आक्रमक शैली पहिली.. 

खूप खडतर परिस्थितीतून ही मंडळी पुढे आली आहेत.. भारताच्या संघात असून, आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळवूनही हे सगळे अतिशय साधे आणि विनयशील आहेत.. ह्याचे कौतुक वाटते.. ह्या व अशा प्रकाशझोतात न आलेल्या सगळ्यांनाच ह्या निमित्ताने सलाम करावासा वाटतो.. स्टार स्पोर्ट्सने ही अद्भुत दुनिया आपणां समोर आणली, हे बरेच झाले.. ह्या हरहुन्नरी खेळाडूंपासून प्रेरणा घेऊन नवीन खेळाडू तयार होतील, असा विश्वास वाटतो.. 

17 May 2014

मोदींना महिलांचा पाठींबा का?



श्री. नरेंद्र मोदी लवकरच भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आता पंतप्रधानपदाचा शपथविधी ही केवळ एक औपचारिकता आहे. ह्या निवडणुकीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे श्री. नरेंद्र मोदींना समाजातील सर्व घटकांतून निर्णायक पाठींबा मिळाला. युवकांनी ज्याप्रमाणे मोदींना उचलून धरले, त्याचप्रमाणे भारतीय महिलांनीही त्यांना मोठ्या प्रमाणात साथ दिली. महिलांना मोदींच्या नेतृत्वाचे आकर्षण का वाटले, याचे विश्लेषण मी ह्या लेखात करत आहे.

भारतीय महिलांविषयी नेहेमीच बोलले जाते की त्यांना राजकीय समज नाही. आपले पती सांगतील त्या उमेदवाराला त्या मत देतात. तसेच भारतीय महिला सोशिक असतात. सामाजिक समस्यांविरुद्ध आंदोलन करण्याऐवजी त्या समस्यांना अंगवळणी पाडून घेतात. येईल त्या परिस्थितीला शांतपणे तोंड देत राहतात. मात्र ह्या मताला ह्यापूर्वीही भारतीय महिलांनी अनेकदा खोटे ठरवले आहे. बदलाची आणि प्रगतीची आस धरणाऱ्या भारतीय महिला अनेकदा भारतीय राजकारणात निर्णायक ठरल्या आहेत. तसेच ह्यावेळी घडले.

मुळात महिलांचा राजकारणाशी खूप जवळचा संबंध असतो (कळत नकळत). त्यांचे रोजचे जीवन राजकारणाने प्रभावित होत असते. विजेचा तुटवडा, पाण्याचा अशुद्ध व अपुरा पुरवठा, अन्नधान्ये आणि भाज्यांच्या वाढत्या किमती, शौचालयांची अनुपस्थिती, सांडपाण्याचा दोषपूर्ण निचरा ह्या महिलांना थेट भिडणाऱ्या समस्या आहेत. तसेच भारतातील मुलींच्या शिक्षणाविषयी अनास्था, माता आणि मुलांच्या आरोग्याची हेळसांड, आणि महिलांसाठी घातक रुढींचा पगडा, ह्यामुळे महिला त्रस्त असतात. अशा परिस्थितीत महिलांनी स्थानीय ते राष्ट्रीय राजकारणात वाढता सहभाग घेणे त्यांच्याच हिताचे आहे, जेणेकरून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात त्यांचा मोठा वाटा असेल.

स्वातंत्र्यानंतरच्या काळात भारतीय महिला मोठ्या प्रमाणावर काँग्रेसच्या पाठी उभ्या राहिलेल्या दिसल्या आहेत. काँग्रेसची सर्वसामान्यांविषयीची धोरणे त्यांना आपलीशी वाटली. त्यातून आपला विकास होईल, असे त्यांना मनोमन वाटले. मात्र विकासाकडे डोळे लावून बसलेल्या भारतीय महिलांना काँग्रेसने तो विकास बहाल केलाच नाही. अशा हताश परिस्थितीतच त्यांना मोदींच्या रूपाने एक आश्वस्त दिलासा मिळाला.

मोदींचे विनयशील तरीही आश्वासक व्यक्तिमत्व, त्यांची समाजमनाची समज, देशाविषयी निष्ठा आणि सुधारणेची तळमळ ह्यामुळे भारतीय महिला मुळातच त्यांच्या नेतृत्वाकडे आकर्षित झाल्या. तसेच मोदींनी केलेला गुजरातचा कायापालट घरा-घरात दूरदर्शन, वर्तमानपत्र यातून पोहोचला. गुजरातमधील २४ तास वीज, कछच्या रणातही पाण्याचा मुबलक पुरवठा, महिलांच्या शिक्षणातील प्रगती, स्त्रीभ्रूण हत्येचा नायनाट, आरोग्यविषयक सुधारणा ह्यामुळे जग अवाक झाले. त्याने भारतातील इतर भागात राहणाऱ्या महिलांच्या मनात आशेचा किरण चमकला. असेच सुखी, समाधानी जीवन आपल्याला हवे असे त्यांना न वाटते तरच नवल! मोदींच्या भाषणांमधून त्यांनी महिला समस्यांना वाचा फोडली. महिला आरोग्य, शिक्षण आणि जीवनस्तर ह्यावर भरपूर भाष्य केले. समस्यांनी पिचलेल्या महिलांना नवीन स्वप्ने दाखवली. ह्यामुळे महिलांचा पाठींबा मोदींकडे वळला.

महिलांच्या मोदी पाठिंब्याला अजून २ कारणे महत्त्वाची ठरली. एक म्हणजे, निवडणुकीत महिला उमेदवारांना खूप प्रोत्साहन दिले गेले. अगदी स्मृती इराणी, उमा भारतींपासून प्रथम उमेदवार मीनाक्षी लेखी, पूनम महाजन, हीना गावित पर्यंत सर्वांनी प्रचारात भाग घेतला. त्यांच्या चेहेऱ्यांतून महिला सबलीकरणाचे प्रतिबिंब दिसले. दुसरे कारण म्हणजे, महिला सुरक्षेचा दिवसेंदिवस गंभीर झालेला प्रश्न. ह्या प्रश्नावर उपाय करण्यासाठी देशाला एका संवेदनशील तरीही सक्षम सरकारची गरज होती. ते दोन्ही गुण फक्त मोदींमध्येच दिसले.

काँग्रेसने मोदींची छबी मलिन करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. त्यांच्या भूतकाळातील विवाहाची चर्चा, जशोदाबेनविषयी खोटे गळे काढणे, महिलेच्या हेरखोरीची अतिरंजित कहाणी, आणि एकंदरच मोदींची 'पुरुषप्रधान' छबी रंगवण्याचा खूप प्रयत्न झाला. डाव्यांनी आणि तथाकथित 'मानवाधिकार' वाल्यांनी तर कहरच केला. पण भारतीय महिला कुठल्याच टीकेने विचलित झाल्या नाहीत. त्यांनी मोदींना पाठींबा देण्याचा निर्णय पूर्णत्वाला नेला. प्रसंगी पतीच्या, घरच्यांच्या सल्ल्यांना डावलून त्यांनी मोदींना भरभरून मतदान केले.

आपले जीवनमान उंचावेल ह्या भाबड्या आशेने भारतीय महिला मोदींच्या मागे उभ्या राहिल्या. त्यांच्या आशेला भविष्यात मोदी कसे पूर्णत्वाला नेतात याविषयी आता उत्सुकता आहे.

14 April 2014

जशोदाबेन

सध्या सार्वत्रिक निवडणुकांचे दिवस सुरु आहेत. वृत्तवाहिन्यांचे कार्यक्रम आणि वृत्तपत्रांचे रकाने निवडणुकीच्या बातम्यांनी भरभरून येत आहेत. हल्ली काही राजकारण्यांनी राजकारणाची पातळी अतिशय खाली आणून ठेवली आहे. अशा राजकारण्यांनी सैनिकांच्या साहसाची गटबाजी केली, निघ्रूण बलात्काऱ्यांच्या बाजूने गळेही काढले. नेतेमंडळीना तर हल्ली एकमेकांवर अश्लाघ्य चिखलफेक करण्यातच धन्यता वाटत असते; आणि वृत्तवाहिन्यांना ही सगळी चिखलफेक परतपरत उगाळत बसण्यात! अशा परिस्थितीत संवेदनशील व्यक्ती काही भाष्य करूच शकत नाही. सुन्न होऊन बघत बसण्याशिवाय काही पर्याय उरत नाही.

तशीच सुन्न-शांत बसून होते. काही बोला-लिहायचीही इच्छा होत नव्हती. पण "ती"ची व्यथा ऐकली. आणि हा संयमाचा बांध फुटला. बोलावं, लिहावं अगदी आक्रस्ताळेपणाने ओरडावं वाटू लागलं. "ती"च्या बाजूने उभं राहावं, सर्वांसमोर जाऊन "ती"ची बाजू मांडवी, असं वाटू लागलं. 

तसं पाहता "ती" अगदी सामन्यांतलीच एक. खेडेगावात, गरीब घरात जन्मलेली. जुन्या वळणाच्या कुटुंबात वाढलेली. ७वी पर्यंत जेमतेम शिक्षण पार केलं, तेव्हाच वडिलांनी "ती"चं लग्न लावून दिलं. अगदी लग्न म्हणजे काय हे कळायच्या आधी "ती" सासरी नांदायला गेली सुद्धा. नवऱ्याशी काही जवळीक होण्याची शक्यताच नव्हती. कारण नवऱ्याच्या मनात राष्ट्रप्रेमाचेच वारे वाहत होते. भारतमातेच्या चरणी लीन होऊ इच्छिणाऱ्या 'त्या'च्या साठी लग्न, बंधन, पत्नी ह्या दुरापास्त गोष्टी होत्या. त्यात अडकून न पडता त्याने त्याचा मार्ग निवडला. तो निघून गेला, तो परत मागे वळून पाहण्यासाठी नाहीच.

जाताजाता "ती"ला एकच संदेश देऊन गेला, 'वडिलांकडे जाऊन तुझे राहिलेले शिक्षण पूर्ण कर'. "ती" देखील नवऱ्याने सांगितलेल्या मार्गाने जाऊ लागली. शिकली-सवरली. शाळेत लहान मुलांना शिकवू लागली. भावांच्या आश्रयाला राहिलेल्या "ती"ने परत दुसऱ्या लग्नाचा कधी विचारच केला नाही. शाळेतील मुलांच्या शिक्षणातच स्वतःला झोकून दिलं. रोज शाळेची नोकरी, दैनंदिन घरकाम, पूजापाठ यातच "ती"ने संपूर्ण आयुष्य व्यतीत केलं. संपूर्ण एकटेपणाचा प्रवास! आपला निघून गेलेला नवरा परत कधीही आपल्या जवळ येणार नाही, आपल्याशी कुठला संपर्कही करणार नाही, याची "ती"ला मनोमन कल्पना होती. "ती"ने तशी आशा देखील कधी बाळगली नाही.

"ती"चा नवरा कैक वर्ष संघ-प्रचारक म्हणून भारतभर फिरला. आतोनात श्रम केले. समाजाचे, राष्ट्राचे कल्याण करण्यासाठी झटला. पुढे राजकारणात सक्रिय झाला. एका मोठ्या राज्याचा मुख्यमंत्री झाला. आणि त्या राज्यात केलेल्या कल्याणकारी कार्यामुळे देशभर प्रसिद्धीस आला. आणि आता 'तो'च भारताचा पंतप्रधान होण्याच्या जवळ पोहोचला आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे या संपूर्ण प्रवासात 'त्या'ला कधीही बायकोची आठवण आली नाही. पण 'त्या'ची उणीदुणी काढणाऱ्या 'त्या'च्या विरोधकांना मात्र "ती"ची आठवण आली. आणि मग "ती"च्या अस्तित्वाचा शोध घेण्याची कुत्सित चढाओढ विरोधक आणि वृत्तसंस्था यांच्यात लागली. 'त्या'ने "ती"ला कसे त्यागले, "ती"ची कशी अवहेलना झाली, "ती"ने कसे एकटेपणात, हलाखीत आयुष्य व्यतीत केले, अशा कथांना उधाण आले. एवढेच नाही, तर "ते" दोघे किती दिवस एकत्र राहिले, त्यांच्यातील संबंध कसे होते, त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले होते का, त्यांचे एकमेकांशी बोलणे होते का, असे अतिशय 'वैयक्तिक' प्रश्न देखील चव्हाट्यावर आणले जाऊ लागले.

गलिच्छ, दूषित राजकारणी हेतूने असे प्रश्न चव्हाट्यावर आणणाऱ्या त्या सर्वांना माझी एक कळकळीची विनंती आहे. "ती"च्या स्वातंत्र्यावर गदा आणू नका. एक परित्यक्ता म्हणून "ती"च्या हक्कासाठी गळे काढणार्यांनो, हे सरळसरळ "ती"च्या  मानवाधिकारांचे हनन आहे. एकटेपणात आणि कष्टात आयुष्य व्यतीत केलेल्या "ती"ची लक्तरे करून अशी चव्हाट्यावर टांगू नका. त्यातून तुमचे 'राजकारणी हित' साधेल की नाही माहित नाही, पण त्यात "ती" आणि "ती"चे कुटुंब मात्र पार उद्धस्त होईल. "ती"च्या पुढील आयुष्यासाठी एवढे करणे टाळा. कृपा होईल!


[ महत्त्वाचे:-
१) मुळात श्री. नरेंद्र मोदी आणि श्रीमती जशोदाबेन ह्यांचा विवाह ते दोघेही लहान (घटनेनुसार १८ वर्षाखालील मुलांना 'minor' म्हटले जाते) असताना झाला. त्यामुळे त्या विवाहाला कुठलाही कायदेशीर आधार नाही...
२)  तसेच श्री. नरेंद्र मोदी आणि श्रीमती जशोदाबेन लग्नानंतर फारच कमी काळ (केवळ ३ महिने) एकत्र राहिले. त्यामुळे असा विवाह कायद्याने सहजरित्या रद्दबातल ठरवला जाऊ शकतो... ]



30 May 2013

मुक्ताफळं


सध्या आपला समाज एका विचित्र परिस्थितीतून वाट काढत आहे. हल्लीच्या वृत्तपत्रांचे मजकूर वाचले, वा काही काळ वृत्तवाहिनी समोर बसले की मन उदासीन होऊन जाते. भ्रष्टाचाराने बरबटलेले हात घेऊनच जनतेसमोर अभिमानाने उभे राहणारे नेते आणि आपल्याच नाकर्तेपणावर निर्लज्जपणे पांघरून घालणारे राजकारणी व प्रशासक पाहिल्यावर शिसारी येते. एकमेकांवर चिखलफेक करण्यात ह्यांचे हात कुणीच धरू शकत नाहीत. ह्याशिवाय, जागोजागी-क्षणोक्षणी होत असलेले बलात्कार, महिलांवरील अत्याचार, अल्पवयीन मुलांवर होणारे अतिप्रसंग, हे सर्व वाचून मनाची अगदी लाही लाही होते.

अशा बिकट परिस्थितीत भारताला दिशा दाखवण्याची मोठी जबाबदारी जाते ती समकालीन वरिष्ठ नेते, वैज्ञानिक, धर्मगुरू, आणि चरित्र नायक ह्यांच्याकडे. मात्र आजमितीला असे 'युग-पुरुष' हाताच्या बोटावर मोजण्याएवढे राहिले आहेत. मग ते लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना मोलाचे मार्गदर्शन करणारे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम असोत, भ्रष्टाचाराविरुद्ध जिद्दीने लढणारे श्री अण्णा हजारे असोत, आपल्या निर्भय लेखणीने अयोग्याची कानउघाडणी व योग्याची प्रशंसा करणारे गिरीश कुबेरांसारखे पत्रकार असोत. भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात स्वतःचा खारीचा वाटा उचलणारे अभिनेते श्री विक्रम गोखले ह्यांचे कार्यदेखील कमी मोलाचे नाही. मात्र हे किरकोळ अपवाद वगळता इतरत्र 'आनंद'च दिसतो. 

गेल्या ४ दिवसांपासून 'idea exchange' ह्या मथळ्याखाली 'लोकसत्ता'चे रकाने नाटककार, अभिनेते श्री गिरीश कर्नाड ह्यांच्या मुक्ताफळांनी भरून येत आहेत. खरेतर गिरीश कर्नाड हे एक थोर व्यक्तिमत्त्व. त्यांच्या विचारी आणि वेगळ्या शैलीमुळे नाटक-चित्रपट क्षेत्रातच नाही, तर इतरत्रही त्यांचा आदर केला जातो. अशा परिस्थितीत कर्नाडांनी बोलताना थोडे तारतम्य बाळगून बोलायला हवे, हे त्यांना आपण सांगण्याची गरज नाही. मात्र प्रसिद्धीची हाव आणि तथाकथित 'बुद्धीजीवी' वर्गात समाविष्ट होण्याची धडपड ह्यामुळे आपण काय बोलतो, ह्याकडे त्यांचे लक्ष राहिले नसणार. 

गुजरात राज्यातील विकास प्रकल्पांची जाहिरात केल्याबद्दल त्यांनी अभिनेते श्री अमिताभ बच्चन ह्यांच्यावर शरसंधान केले अहे. अमिताभचे हे वागणे 'संतापजनक' असल्याची टीका त्यांनी केली आहे. (काही वर्षांपूर्वी माननीय नाटककार श्री विजय तेंडूलकर ह्यांनी देखील 'नरेंद्र मोदींना गोळी घालेन' असे भ्याड, बिनबुडाचे विधान केले होते. गिरीश कर्नाड हे देखील त्यांचेच मित्र!), अशाप्रकारचे विधान करताना कर्नाडांनी 'लोकशाही' व 'भाषण स्वतंत्र' ह्याचा पुरेपूर वापर केलेला आहे. मात्र ह्याच 'लोकशाही' पद्धतीने बहुमताने निवडून आलेले गुजरात सरकार मात्र त्यांच्यासाठी टीकेस पात्र आहे. एखाद्या राज्यात एक पुढारी प्रचंड बहुमताने तीनतीन वेळा निवडून येतो, आणि तरीही आपल्या सारखे तथाकथित 'बुद्धीजीवी'आणि 'लोकशाहीचे स्तुतिपाठक' त्याची निष्कारण अवहेलना करण्यात मागेपुढे पाहत नाहीत, ह्याचा अर्थ काय ?

तसेच, 'बाबरी मशीद प्रकरणातून झुंडशाहीला राजमान्यता' असेही एक विचित्र विधान केले आहे. बाबरी मशीद प्रकरणाला  झुंडशाही म्हणेपर्यंत ठीक आहे. पण त्याचा १९९६ आणि १९९८ मध्ये भा.ज.प. च्या सत्तेवर येण्याशी संबंध लावणे हे कुणाही विचारी माणसास न पटणारे आहे. 'बाबरी मशीद पडणारेच सत्तेवर आले' असे म्हणताना कर्नाडांनी भारतीय मतदारांचा घोर अपमान केलेला आहे.  असे सरकार जर 'बाबरी मशीद पडणारे' होते, तर प्रचंड बहुमताने सत्तेवर आलेच कसे? भा.ज.प. सरकारने १९९८ नंतर आपला कार्यकाल पूर्ण करून अनेक लोकोपयोगी कामे केली. अशा सरकारला व त्यातील नेत्यांना 'बाबरी मशीद पडणारे' म्हणण्याचा मूढपणा कर्नाडांनी केला आहे. 

असो. ही व अशी मुक्ताफळं अजून २-३ दिवस लोकसत्ता मधून छापून येत राहतील. कारण पेपरवाले काय किंवा channel वाले काय, त्यांना फक्त 'TRP' दिसत असतो. त्यात त्यांचा तरी काय दोष म्हणा! त्यांच्याबद्दल तर न बोलणेच अधिक युक्त.

ह्या लेखाचे मुख्य लक्ष आहे, ते म्हणजे अशाप्रकारे मुक्ताफळं  उधळणारे.. वरीलप्रमाणे वक्तव्य करणारे गिरीश कर्नाड, आपल्या ब्लॉगवर आपल्याच पक्षाबद्दल उलटसुलट लिहिणारे लालकृष्ण अडवाणी, बिनबुडाचे दिग्विजय सिंघ, सामान्य जनतेला 'गुराढोरांचा वर्ग' म्हणणारे शशी थरूर, आणि 'मुलींच्या चुकीमुळेच बलात्कार होतात' असे म्हणणारे आसाराम बापूं, सगळे एकाच माळेचे मणी! ह्यांच्या अशा मुक्ताफळांमुळे भारतीय जनतेची दिशाभूल होतेय, हे ह्यांच्या कधी लक्षात येणार???

28 September 2012

कोमेजलेली फुले

गणेशोत्सव आला की सर्वत्र कार्यक्रमांचे वारे वाहू लागतात. गाण्यांच्या मैफिली, ऑर्केस्ट्रा, नाटके, मुलाखती.. कितीतरी कार्यक्रम मोठ्या हौसेने आयोजित केले जातात आणि तेवढ्याच उत्साहाने रसिक त्यांचा भरभरून आस्वाद घेतात. महाराष्ट्रापासून दूर राहणाऱ्या आमच्यासारख्या रसिकांना तर हीच पर्वणी असते मराठी कार्यक्रम पहायची. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिल्लीत गणेशोत्सव धामधुमीत साजरा केला. ५ दिवस सलग कार्यक्रम होते.
ह्या ५ दिवसात सगळ्यात जास्त आकर्षण होते ते म्हणजे "सा रे ग म प- little champs" च्या गाण्याच्या कार्यक्रमाचे. गणेशोत्सवाचा 'climax ' म्हणून हा कार्यक्रम सगळ्यात शेवटी ठेवण्यात आला. ४ वर्षांपूर्वी झी 'सा रे ग म प' मधून घराघरात पोहोचलेली ही मुलं संपूर्ण महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत बनली होती. मुग्धा, आर्या, रोहित, कार्तिकी आणि प्रथमेश ह्या मुलांनी आपल्या गोड आवाजाने आणि लाघवी वागण्याने सगळ्यांनाच आपलंसं केलेलं होतं .
ह्या मुलांना एवढ्या वर्षांनी परत पाहायला मिळणार, त्यांच्या सुमधुर आवाजात अनेक गाणी ऐकायला मिळणार ह्या विचाराने आम्ही अतिशय आनंदात होतो. प्रत्यक्षात कार्यक्रमही खूप छान झाला. मुळात आवाजाची नैसर्गिक देणगी, प्रत्येकाची गाण्याची एक खास style, वर्षानुवर्षे श्रोत्यांचे मिळालेले प्रेम आणि आशीर्वाद, आणि अनुभवाने आलेला प्रचंड आत्मविश्वास.. ह्या सगळ्याच्या जोरावर ही मुले छान गायिली नाहीत, तरच नवल. एकाहून एक सदाबहार गीतं सादर झाली. अनेक गाण्यांना दिलखुलास once-more मिळाले. कार्यक्रम खूपच रंगला.
परंतु.. एक गोष्ट राहून राहून मनाला त्रास देत होती. ह्या मुलांचा आवाज आता पूर्वीप्रमाणे टवटवीत राहिलेला वाटला नाही. प्रत्येक सुंदर फुलाला कोमेजण्याचा शाप असतोच. पण ही सुंदर फुलं अकालीच का कोमेजू लागली, असा प्रश्न मनात डोकावू लागला.
'सा रे ग म प' च्या त्या पर्वापासूनच ही मुलं प्रसिद्धीच्या झोतात आली. सगळीकडे त्यांचा उदोउदो होऊ लागला. पर्व संपल्यानंतरही त्यांना अनेक कार्यक्रम मिळू लागले. त्या ५ जणांनी मिळून एकत्र अनेक कार्यक्रम केले. ठिकठिकाणी जाऊन गाण्याच्या मैफिली रंगवल्या. मात्र ह्या सगळ्या गडबडीत त्यांनी स्वताच्या रियाझाकडे कितपत लक्ष दिले ह्याबद्दल शंका वाटते. शिवाय कार्यक्रमातील गाण्यांची निवड देखील श्रोत्यांना पसंत पडावी अशी असल्याने मोठ्या आवाजातील, उडत्या चालीची गाणी ते अधिक म्हणतात. अति गायनामुळे निश्चितच स्वरयंत्रावर ताण पडत असणार. त्यामुळे आवाज खरखरीत होत जातो. तसा खरखरीतपणा ह्यापैकी काहींच्या आवाजात जाणवला. महाराष्ट्राची लाडकी असलेली ही मुले मोठी होईपर्यंत त्यांचे आवाज टिकवू शकतील की नाही अशी मला शंका वाटते.
संगीत (वा इतर कुठलीही कला) ही एक साधना आहे. अशा कार्यक्रमांमुळे अचानक प्रसिद्धी मिळते, पैसा मिळतो.. पण त्याला साधना मात्र म्हणता येत नाही. ही आणि अशा प्रकारची अनेक मुले उत्तम performer बनू शकतात. मात्र 'गायक' बनण्यासाठी हे पुरेसे नसते..!!! 

13 March 2012

White Tigers: Cruelty not Conservation

(This is a piece of information I found alarming.. and could not stop myself from sharing..)


Many think that the White Tigers are the most beautiful animals on earth. Mesmerised by their rare beauty, many of us are unaware of what makes a White Tiger white. The truth is, White Tigers are white because of the genetic mutation that causes a condition called ‘Leucism’. Leucistic animals are similar to Albino animals. It appears usually in Bengal tigers, and not in any other species of tigers, not even in Siberian tigers.


The only way to produce a White Tiger is through the inbreeding of brother to sister, father to daughter and mother to son. This kind of severe inbreeding that is required to produce the mutation of a white coat also causes a number of other defects in these big cats. The same gene that causes the white coat causes the optic nerve to be wired to the wrong side of the brain, thus all white tigers are cross eyed, even if their eyes look normal.  They also often suffer from club feet, cleft palates, spinal deformities and defective organs. Thus, the White tigers are actually very weak and live shorter lives.



In addition, There is no place in the world that tigers naturally inhabit where white coat is helpful. In fact for a tiger, being white in the wild is a distinct disadvantage. For this reason, they are generally kept in human captivity and cannot be released in the wild.

While the healthy orange-black tigers in the wild are disappearing at an alarming rate, inbreeding for producing White Tigers is carried on at fast pace. However, the beauty of White Tigers and our fascination with them are not enough reason to continue the practise of inbreeding them for commercial purposes. Millions of dollars are spent every year to inbreed White Tigers and people spend thousands to see them. Instead these resources can be used for conservation of the habitat of healthy orange-black tigers!!!

25 January 2012

Role of Youth in World Politics


Year of 2011can be rightly termed as the ‘year of political upheavals’. The New Year was welcomed by severe protests in Tunisia that led to toppling of the longtime President Ben Ali. This was followed by Tehrir square protests in Egypt ousting the authoritative president Hosni Mubarak. This awakening took little or no time in spreading to various other parts of the Arab world. Civil war broke out in Libya, and uprisings were organized in countries like Syria, Bahrain and Yemen against saturation in the political systems. All these events are collectively referred to as the ‘Arab Spring’, which put an end to various autocratic regimes in the Arab region. We, in India, have also experienced a systematic anti-corruption movement this year. Though this movement was not aimed at any particular regime or political party, it attacked the prevalent evils in the politics in general and society in particular.

These upheavals mobilized millions of youngsters. The issues they were addressing were directly related to the lives of the youth; poverty, unemployment, unequal distribution and corruption, to name a few. This is the reason why young people spontaneously joined the protests. They also made use of the communication technology, including social networking sites like Facebook and Tweeter to widely spread their ideas. Electronic media also supported the movements.

Contemporary political uprisings started the discussions about the role of youth in politics time and again. As we know, the youth in any society is closely associated with its scientific and technological advancement, economic wellbeing, industries, entertainment, sports and so on; but not so much with its politics. Politics has certain inherent qualities in it which majorly restrict itself to the grey-haired population. In such a scenario, assertive role played by youngsters in these movements cannot be ignored.

The present era is witnessing unprecedented scientific advancement. World has come closer as never before, through cyber-web, internet, and number of social networking sites. These are the areas where youth have the exclusivity. Through various social networking sites such as ‘facebook’, young people from various parts of the world have befriended their fellow youngsters from other countries. There take place discussions over various issues of international concerns. This has strengthened ‘people to people contact’ or what can also be called as ‘track 3 diplomacy’. Youngsters are exchanging the ideas about the worldview with each other. They are facing common problems and are seeking to find common ways to deal with these problems.

The young generation is increasingly taking interest in voluntarism and related forms of public service and is engaged into community-based, non-profit charitable efforts in order to make their respective societies a better place to live. This aspect of youth cannot be disregarded as they have become part of vibrant ‘civil society activism’ in almost all parts of the world. Historically, youth is identified with principles such as democracy, peace, cooperation, human rights and so on. There are struggles going on in the world for achieving these ideals, and young population is an important part of such struggles.

Nevertheless, when it comes to role of youth in world politics, there are also certain challenges. These challenges need a mention.

Firstly, in almost all parts of the world, more so in the advanced countries, youth has become self-centered, individualistic, consumerist and materialist. Many of them are addicted to alcohol and drugs.

Secondly, everywhere, more so in the third world, youth is increasingly swayed by reemerging primordial identities, and thus, is going away from modernism and democracy. The example can be found in the rising number of young ‘fidayeens’ who are ready to sacrifice their lives pertaining to religious extremism.

Thirdly, role played by youth is more spontaneous and less organized. We have seen, millions of youngsters gathering for the rallies with a lot of eagerness. But their initial enthusiasm does not persist for long. Egyptian experience has shown the energetic protests by the youth. But they have taken a backseat in the electoral game, giving a way to ‘Muslim Brotherhood’ to win the elections. Now, time will decide whether this energetic youth is really interested in playing role in carving their future, or it was just a spur-of-the-moment. Similarly in India, youngsters who took part in the anti-corruption rallies, furthermore have the responsibility to ensure building of the corruption free society.

Keeping all the aspects of contemporary world scenario in mind, it can rightly be said that, today’s youth has a number of challenging tasks to fulfill. They are expected to extend their cooperation in the struggles for democracy, creation of an egalitarian society, preservation of human rights and end of discrimination in various parts of the world. Even the tasks such as disarmament, climate change and global struggle against terrorism and extremism cannot be achieved without their active involvement.

After all, today’s youth are going to be tomorrow’s leaders. At the moment, they have a choice in shaping their future, whether peaceful, democratic and egalitarian, or that full of chaos, fights and bloodshed..!!